हिंदुत्व ,पुरोगामीत्व,देव यावर कांही मुद्दे विचारार्थ लिहितो. -राजीव लिपारे 1)हिंदुधर्म म्हणजे मनुवाद नव्हे, समजुतीमधील अशा गफलतींमुळेच पुरोगामी विचारसरणीत विकृती आलेली आहे व त्यांचा जनाधार लयास गेलेला आहे. पुरोगामी विचारसरणीचे लोक धर्म निरपेक्ष भूमिका सोडून जसजसे मुस्लिम व ख्रिश्चन अनुनयाची भूमिका घेऊ लागले तसतसा त्यांचा जनाधार ओसरत गेलेला आहे. अशा भूमिकांमुळेच बहुसंख्य समंजस हिंदू bjp कडे नाईलाजाने ढकलले गेले. 2)घटना समितीमधील 90% सदस्य हिंदू धर्म मानणारेच होते.हिंदुधर्म म्हणजे मनुवाद असता तर अशी धर्म निरपेक्ष व प्रत्येकाला प्रगतीची संधी देणारी घटना लिहिली गेली नसती. 3)मी जितके आंबेडकर वाचलेले आहेत त्यात मला त्यांची समंजस व विचारी भूमिकाच दिसलेली आहे, कोठेही द्वेष नाही. माझ्या विचारांचा विवेकानेच मागोवा घ्या, आंधळेपणाने शब्दप्रामाण्य मानू नका असे ते सांगतात. मात्र त्यांचे कांही अनुयायी त्यांच्या आडोशाने कडव्या माओ वादाकडे झुकलेले दिसतात हे दुर्दैव! 4) बाबासाहेबांसह सर्वच महापुरुष हे आपापल्या काळाच्या चौकटीत बंदिस्त असतात. त्यांचे शब्द व प्रासंगिक भूमिका या त्या त्या स्थळ, काळ व ...
पोस्ट्स
ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे